-

मंदी ,माणूस आणि महाराज...

>> Tuesday, December 30, 2008


जगभर मंदीची लाट जोरदार वहात आहे.अजून वर्षभर तरी ती रहाणार असे आपले अर्थतज्ञ सांगत आहेत.सहाजीकच भारतालाही ती झळ पोचत आहेच.बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय बंद पडत आहेत.महागाई वाढत आहे.अशा सर्व गोष्टींचा परीणाम शेवटी माणसाच्या मनावर होणारच.मग तो कुठेतरी आधार शोधू लागणार.दान धर्म ,बाबा,बूवा ,महाराज यांच्या कडे ओढला जाणार.तिथे गेल्यावर काळजीतून आपली मुक्तता होईल अशी त्याची भाबडी आशा असणार...

हल्ली बाबा ,महाराज, प.पू. यांचे मोठे मोठे पोस्टर्स,बॅनर्स यांनी भरून गेलेले बस स्टॉप्स , भिंती अगदी सहज पहायला मिळतात.सत्संग, महाशिबिर ,दर्शन सोहळांनी शहरातली मैदानं भरलेली असतात.त्या शिबिरात तुम्ही गेलात तर तुम्हाला मनशांती मिळेल ,मोक्ष मिळेल ,पैसा मिळेल असं वाट्टेल ते सांगितलं जातं. मंदीचा अडचणीचा काळ हा तर अशा लोकांना फूल प्रोफ़िट चा असतो.जितक्या अडचणी जास्त तितके त्यांचे गिऱ्हाईक जास्त!आडला नारायण गाढवाचे पाय धरी याप्रमाणे अडलेली लोकं या गाढवांचे पाय धरतात. महाराष्ट्रातील कितीतरी बाबा बुवा महाराजांनी ज्ञानेश्वरीवर बक्कळ पैसे कमावले आहेत.ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पसायदानातही स्वत:चे नाव टाकले नाही पण हे so called महाराज आपले नाव खाली लावायला विसरत नाहीत.अगदी बडी बडी सुशिक्षित माणसेही त्यांच्या कडे अशी जातात यचं मला फ़ार आश्चर्य वाटतं.मग गावाकडची अशिक्षित लोकं जर एखाद्या भोंदू साधू कडे गेली तर त्यांना का नावं ठेवावीत??त्यांच्यात आणि तूमच्यात फरक काय??राजकारण्यांमध्ये अशा महाराजांच्या सत्काराची चढाओढ चालू असते.ते किती महान आहेत ,भगवान आहेत हे लोकांना पटवून पटवून संगीतलं जातं,TV channels वाले त्याला भरपूर प्रसिद्धी देतात.तो माणूस महाराज व्हायच्या आधीची history कोणिही तपासून पहात नाही.जर तपासून पाहिलं आणि काही झोल सापडला तर त्याचे आनूयायी ,चेले गोंधळ घालतात , बसेस फोडतात , बंद करतात.
१००००००००० लोकसंख्या असलेल्या भारतात किमार लाखावर बाबा बूवा असतील.सर्वात सोपा ,भरपूर पैसे ,प्रसिद्धी मिळतेच त्याचबरोबर पूढच्या ७ काय १४ पिढ्यांची सोय या धंद्यातून करता येते.सोबत दिमतीला free सेवक असतातच.

पण हे असच चालू रहाणार आहे का??भारत हा बाबा बूवा साधूंचाच देश असणारे का??
माझ्यामते तरी अशा भोंदूंना आपणच हाकलून लावलं पाहीजे.आपणच जर मनानी कणखर झालो,संकटाला सामोरं जाण्याची ताकद जर आपण आपल्यात निर्माण केली तर काय गरज आहे या बाबा,बूवांच्या कुबड्यांची??ज्ञानेश्वरी स्वत: वाचून स्वत: त्याचा अर्थ आपण लावू शकत नाही का??आपण स्वत: कसं जगावं हे आपण art of living मधून शिकण्याइतपत आपण विचारहीन झालो आहोत का?? जगायचं कसं हे सूद्धा दूसऱ्यानी सांगावं??प.पू.ंचा आशिर्वाद घेतल्यानी व्यवसायाय प्रगती होणार आहे का??बालाजीला या वर्षी जर २ रूपये दिले तर पूढच्या वर्षी तो तूम्हाला ४ रूपये द्यायची ऐपत देतो असं म्हणतात.जर देवही अशी लाच घेत असेल तर त्याला देव का म्हणावं??मग सरकारी कचेऱ्यांमधे लाच आधिकृत केली तर?ह्यात देवाचा काहीही दोष नसून मनूष्य-प्रौऋत्तीचा आहे.मनोभावे एखद्यानी कही मगितलं तर त्याला ते मिळणार का त्यासाठी १०० ची नोटं दानपेटीत टाकावीचं लागणार??

स्वत:वर विश्वास ठेवणं हा या सर्वांवरचा जालीम उपाय आहे......तो असेल तर तोम्हीच तुमचे देव असाल..अर्थात हे शेवटी माझं मत आहे....आणि भारतात लोकशाही आहे... :)

Read more...

स्वारी किल्ले प्रबळगड...Prabalgad

>> Saturday, December 20, 2008


प्रबळगड आणि डावीकडे कलावंतीण
नमस्कार मित्रहो..
मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो.
दोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं.
सधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे. भल्या मोठ्या बंगल्यांच्या स्कीम्स , रेसोर्ट्स मुळे गावाला थोड्याच वर्षात शहरी लूक येइल हे नक्की.प्रबळगडजवळ कलावंतीण नावाचा सूळका आहे.बहूतेक ट्रेकर्स मध्ये गडापेक्षा हा सूळका त्याच्या दगडात कोरलेल्या पायय्रांमुळे प्रसिद्ध आहे.एक दीड तासाच्या पायपीटीनंतर आपण माचीवर पोचतो.पसारा ,उंची आणि कोकणातलं दमट हवामानमुळे प्रबळगडानी माझी तर पूरती हवा काढली.
गडाच्या माचीवर प्रबळगडमाची नावाचं १०-२० घरांचं गाव आहे.पूण्यापेक्षा मुंबईला हा गड जवळ असल्यामुळे तिथली लोकं जास्त भेटं देतात.
शिधा बरोबर नेला नसल्यास आगाऊ संगितलं तर या गावातली लोकं सूद्धा जेवणाची व्यवस्था करतात.फ़क्त अगदी पंचपक्वांनाची अपेक्षा करू नये.जेवाण झाल्यानंतर त्यांना पूरेसा मोबदला द्यावा.परंतू उगाच जास्त पैसे देउ नयेत.नाहीतर ते ताडी पिउन उडवतात.आम्हाला भेटलेले १,२ सोडले तर सगळे फ़ूल टल्लीच होते.
दूपारी पोचल्यावर कलावंतीणीवर चढायला सुरवात केली.चार साडेचार ला वरती पोचलो.
अंधार पडायच्या आत फोटो काढून घेतले. प्रबळगडच्या माहीतीचा छोटा विडीओ घेतला.जातानाच चूलीसाठी वळलेली लाकडं घेउन वर गेलो.पोचलो तेव्हा वारा पडला होता. थोडा वेळ विश्रांती घेउन मॅगी करायला घेतली.अग्नीदेव फारच लवकर प्रसन्न झाल्यामुळे पोटपूजा लवकर संपली.
तंबू टाकून मुंबईला जाणाय्रा विमानांकडे पाहात बसलो ,गप्पांनंतर झोपलो.तंबू कड्यापासून १ फ़ूटावरचं होता कारण दूसरी सपाट जागाच नव्हती. कडा पण चांगला एक दीड हजार फ़ुट होता.रात्री झोपताना वारा अगदी शून्य होता. कशाला स्वेटर आणले असं वाटल.आभाळ आल्यामूळे जास्तच गरम होत होतं.तंबूच्या जाळीतून ढगांच्या मागून पळणाय्रा चंद्राला बघत झोप लागली.पण रात्री असा काही वारा सूटला की काय सांगायचं. तंबू वाकून अगदी चेहय्राला टेकत होता.दार वाय्रावर फ़डा फ़डा वाजत होतं.मधेच बाहेर राहीलेली बाटली गडगडत गेल्याचा आवाज आला.आम्ही दोघे कुंभकर्ण तसेच दडपुन झोपुन राहीलो.६ ला पुढे चालू लागायचं असं झोपताना ठरवून साडेआठला उठलो.वारा पळत होताच.शेवटी मी उठलो.चेन उघडून बाहेर डोकं काढलं.सूर्य अजून ढगातच होत.मोन्याला म्हणजे मोनिश ला हलवून मि बाहेर पाउल टाकून बूट घालत होतो तेव्हड्यात जोरात वारा आला आणि तंबू मोन्याला घेउन कड्याकडे सरकला. उडी मारून तंबू धरला ,मोन्यापण धक्क्यानं जागा झाला आणि बाहेर येउन बसला.तो बाहेर आल्यावर तर तंबू अजून जोरात हालू लागला.तसचं त्याला गूंडाळलं आणि सामान आवरलं.

निवांत उठून परत तोच मॅगी चा नाश्ता केला.काल येताना एका ठाकराने वरती पाण्याचे टाकं असल्याचं सांगीतलं होतं , पाण्याची एकचं बाटली शिल्लक होती म्हणून टाकं शोधायचं ठरवलं . तूम्हाला जमणार नाही अस त्यानी आम्हाला सांगीतलं होतं.पण आमच्या अंगात कीडे आणि अडवायला ही कोणि नसल्यामुळे टाकं शोध सुरू केला.सूळक्याच्या उत्तरेला वाट खाली खिंडीत उतरत होती.मधे-मधे पायय्रा खोदलेल्या होत्या.
पण रेती आणि गवतामुळे वाट निसरडी झाली होती.खाली घसरलो तर सरळ यमाकडे पोच पावती मिळायची.
तसेच कड्यवरून खंद्यावर पाय ठेवत उतरून खिंडीत आलो.दोन्ही बाजूला खोल दरी होती ,दरीत जंगल आणि पायाखाली घसरडी माती.खिंड अगदी ताशीव आहे,टाकीचे घाव कातळावर दिसतात.तिथे उतरल्यावर डाव्या बाजूल खाली सधारण अडीच बाय अडीच फूटची गूहा दिसली.वाकून बघितल्यावर गूहा बरीच खोल असल्याची जाणीव झाली.आत काळाकुट्ट आंधार होता.मोन्यानी दोन चार दगड आत टाकून बघून आत काही आहे का ते बघितल. थोडा विचार करून आत जाउया असं ठरलं,टॉर्च नव्हताच मग मोन्यानी त्याचा मोबाइल काढला.त्याच्या अंधूक प्रकाशा गूढग्यावर रांगत आत शिरलो.आत कूबट वास पसरला होता.पण तो वट्वाघळांचा नव्हाता.रांगत रांगत १०’ आत गेलो वाट डावीकडे जाउन परत उजवीकडे वळली होती.पुढे जाउच असं ठरवून परत आत सरकलो.पुढे पाहतो तर वाट परत डावीकडे वळली होती.अंधार,वास आणि थोडी भिती मुळे जोरदार घाम फूटला होता.डवीकडे ,उजवीकडे करत २५’-३०’ आत आलो होतो.सुदैवाने आत काही हालचाल जाणवत नव्हती.तसेच पुढे सरकलो ,वाट काहीशी संपल्यासारखी वाटली.खालचे खडे गुढग्याला टोचत होते.वाट संपली, मोबाईलच्या प्रकाशात आत बघितले तर चांगली २५’लांब १५’ रुंद ४’उंच दगडात कोरलेली खोली होती. चारही बाजूला क्षारांचे पंढरे ओहोळ दिसत होते.कोपय्रात थोडी लाकडं जमा केलेली दिसली.थोडा वेळ थांबून चारही बाजूला काय काय आहे ते पाहीलं आतपर्यंत हवा पोचत नसल्यमुळे घुसमट होत होती.घामानी अंग भिजलं होतं.गुहेत कोंडल्यासारख वाटत होतं मग लगेच रांगत बाहेर पडलो.बाहेर आल्यावर एकदम भारी वाटलं,मोकळ्या हवेच महत्व पटलं.
गुहेच्या बाहेर परत वाटेवर आलो.पुढे वाट टाक्याकडे जात होती.डावीकडे वळून कड्याला चिकटून गवत पायात दाबत पुढे चालू लागलो.खाली खोलवर प्रबळगड्माची गाव दिसत होतं,गावतून येणारे आवाज दरीमध्ये घूमत होते.३०,४० पावलं पुढे गेल्यावर टाकं लागलं पाणी एकदम हिरवगार ,शेवाळ्यान भरलेलं निवळीचे किडे मधेमधे फ़िरत होते.कड्याच्या इतक्या कडेला टाकं कसं खोदलं असेल यचं आश्चर्य वाटत होतं. १० १५ मिनीट बसलो.बय्राच वेळानी सावली मिळाली.
टाक्यापर्यंत आलेली वाट पुढे दरीकडे कातळाला चिकटून उतरत होती.मोन्या म्हणाल मी २ मिनिटात बघून येतो.तो गेला आणि मी खालच्या दरीतलं जंगल बघत बसलो.धनगर आणि त्याची जनावरं बारीक ठिपक्यासारखी दिसत होती. तो बहुधा मला हात दाखवत होता.काही कळत नव्हतं.१० १५ मिनिट झाली मोन्या परत आलाच नाही.मग हाका मारायला सुरूवात केली.दरीतून आवाज घुमून परत मलाच ऐकू येत होता.पण मोन्याच्या काही रीप्ल्याय नाही.५-१० मिनिटं गेली. हाका चालूच होत्या.मग मी पण ती वाट उतरू लागलो. पहिल्यांदा दगडातल्या काही २’-२.५’ पायय्रा लागल्या. वाट कड्याला चिकटून गोल फिरत पुढे जात होती.मोन्याचा पत्ताच नव्हता शेवटी मी खाली दरीत कुठे दिसतोय ते बघयला लागलो.धनगर माझ्याकडे बघत उभा होता.मधेच हात हलवत होता.वाट हळूहळू लहान लहान होत होती.दगडं संपून गवत चालू झालं.दोन्ही हातांनी डावीकडच्या कातळाला धरून मी पुढे जात होतो.वाट इतकी लहान झाली होती की पावलं शेजारी शेजारी मावत नव्हती.खाली तर दरी होतीच.आता मी मोन्याला हाका मारणं पण बंद केलं.फक्त खाली दरीत बघत होतो.पण जंगलाशिवाय काहीच दिसत नव्हत.आतापर्यंत बराच पुढे आलो होतो.
सूळक्याला जवळजवळ पाउण प्रदक्षीणा झाली होती आणि वाटचं संपली. मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता.इकडे तिकडे बघितलं , हात जिथ टेकला होता तीच खोबण होती तीच्या वरती अजुन एक अशा वरती जाणाय्रा दगडातल्या पायय्रा दिसल्या.जेमतेम आपला चवडा मावेल इतक्या. एक एक पायरी वरती चढू लागलो.मध्येच वाय्रानी तोल जात होता.डोळ्यात धूळ भरत होती.चढत चढत १५ ’-२०’ वरती आलो आणि पुढच्या पायय्राच दिसेनात.गवतात सगळ गडप झालं होतं. जास्त पाय ताणला असता तर पायात गोळे येतात म्हणून तेही करत नव्हतो , पायात गोळा आल तर थेट खालीच.पाच दहा मिनिट तसाच एका जागी थांबलो.घामानी अंग भिजलं होतं आणि भितीनं पाय लटपटत होते.दोन्ही हात दगडाच्या फटीत घातले होते.उजवीकडे थोद्या लांब एक दगड होता,त्यावर गवत माजलं होतं.पाय थोडा ताणून तिथं टेकवला.स्थिर झालो.
उजव्या बाजूला आधार शोधत होतो तितल्यात पायाखालचा दगड खाली सरकला ,हाताला धरायला काहीच मिळालं नाही आणि दगडावर घासत ५-६ इंच खाली घसरलो.पण त्या छोट्या अंतरानी अगदी ब्रंम्हांड आठवलं , अगदी कपाळात जायची वेळ आली.एका क्षणात आयुष्याचा फ़्लॅशबॅक डोळ्यासमोरुन गेला.आइ बाबांची अगदी मनापासून आठवण आली.उद्याच्या पेपरामधली ’तरूण बेपत्ता’ची बातमी दिसू लागली.खाली पडलो तर तुकडे गोळा करायला NGS Commandosना बोलवायला लागलं असतं.तेही मिळाले असते का यात शंकाच आहे. मोन्याची काळजी होती.दोन मिनिट जागीच तडफडत पोटावर भार देउन उभा होतो.पायाखाली आधाराला काही नव्हतच.हाताला आधाराला थोडी जागा मिळाली.चित्रगुप्त माझ्या वहीत समाप्त असं लिहिणार तेव्हड्यात वरून मोनिश ची हाक ऐकू आली.मोन्या वरती १०’ वर उभा होता.हातात छोटी दोरी होती.मोन्याला बघितल्यावर एकदम जिवात जीव आला आणि परत त्याच दगडावर पाय देउन वरती सरकलो.थोडी सपाट आडवी जागा मिळाली.मोन्याच्या चेहय्रावर पण मी दिसल्याचं समाधान दिसत होतं.वरती जाउन कड्याला टेकून उभा राहीलो.पण वरती पायय्रा नव्हत्या.डावीकडे वाटच नव्हती.उजवीकडे नशीबानी पायवाट दिसली,१५ २० पावलं चालल्यानंतर सूकलेलं टाकं लागलं.चित्रगुप्तानं पेन खाली ठेउन वही मिटली.
मोन्या उतरून खाली आला होता.मग तिकडून पुढे मूख्य पायवाटेला लागलो.मागे वळून परत एकदा कड्याकडे बघितलं आणि मावळ्यानी आशा कड्यावर पायय्रा कशा खोदल्या आसतील असा विचार केला.१० १५ मिनिट दगडावर बसलो.पाय अजूनही हालत होते.मोन्याही त्याच वाटेनं वरती आला होता आणि त्याचीही परिस्थिती माझ्यासारखीच झाली होती.त्याचाही घसा हाका मारून कोरडा झाला होता.पण दोघांनाही कशा ऐकू आल्या नाहीत याचं खूप आश्चर्य वाटलं.मग दोघही माझी कशी फाटली हे दोघांना सांगू लागलो.त्याला पण मी कदाचीत खाली गेलो असं वाटून तो दोरी वगरे घेउन निघाला होता.मग परत पायवाटेनं सूळक्याच्या वरती गेलो.सामान तिथेच पडलं होतं.१५ मिनिट बसलो,एकमेकांचे किस्से ऐकले आणि खाली गावात निघालो.वेळ नसल्यामुळे गडावार जाण्याचं कॅन्सल केलं.

कलवंतीण आमच्याकडे बघून हसत असल्याचा भास होत होता.म्रूत्यूच भय काय असत ते जाणवलं.गावात थोडा वेळ थांबून कोरा चहा घेउन थेट खाली वडापाशी पोचलो.गाडीवर टांग मारून पूण्याकडे निघालो पण मनातून मात्र त्या कड्यावर तसाच लटकत होतो.....

प्रबळगडावरून कलावंतीण


प्रबळगडचा कडा


तंबूची जागा


प्रबळगड माची गाव


Read more...

ताडोबा वाचावा..वाघ वाचवा...

>> Thursday, December 11, 2008

नमस्कार मित्रहो...
मागील आठवड्यात पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरमध्ये CMS Vatavan या संस्थेने Wildlife Film festival चे आयोजन केले होते.जागतीक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या तसेच अनेक भारतीय निर्मात्यांच्या अनेक दर्जेदार फ़िल्म्स तिथे दाखवण्यात आल्या.
Global warming ,Shark ,cats यासारख्या अनेक विषयांवर बय्राच फ़िल्म्स होत्या.

अर्थात वाघावरही फ़िल्म होतीच....भारतातल्या वाघांच्या सध्य स्थितीवर एक छोटीशी Documentry दाखवण्यात आली.परंतू ती पाहील्यावर मन फार विषण्ण झालं...Project Tiger ची वाताहत,वाघांची कमी होणारी संख्या ,माणसांचे वाढणारे अतिक्रमण , सरकारची उदासीनता , वाढणारी तस्करी पाहून येणाय्रा भारताला " वाघ " दिसणार का? असा प्रश्न पडला.
वाघांच्या Documetry नंतर वन्यजीव संशोधक अमोल खेडगीकर यांनी ताडोबा "अभयाराण्याबद्दल" सांगीतलेल्या माहीतीने तर मती गूंग होण्याची वेळ आली. अमोल खेडगीकर ताडोबा मध्ये गेल्या ३ -४ वर्षापासून जंगलातच राहून अभ्यास करत आहेत.

तर ,त्यांनी काय सांगितले हे मी तूम्हाला थोडक्यात सांगतो..

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये Tadoba Andhari Tiger Reserve(TATR) म्हणजेच ताडोबा राष्ट्रीय अभयारण्य आहे.वन्यजीव व वाघांच्या विपूल संख्येने सम्रूद्ध असा हा भाग आहे.आपल्यापैकी बय्राच जाणांनी हे जंगल आधी बघितलंही असेल पण जर आताच काही हालचाल केली नाही तर या सर्व मौल्यवान संपत्ती ला आपण हरवून बसू आणि वाघ भारतातून परीणामत: जगातून नष्ट होतील..

ताडोबा अभयारण्य ही भारतातील वाघांची देवराई आहे म्हणजेच Tiger Bank . इथे जन्म घेउन वाघ भारतातल्या वेगवेगळ्या जंगलांमध्ये पसरतात.या वेळचा सूगीच काळ तर इतका चांगला गेला आहे की आत ताडोब्या मध्ये २ वाघीणींनी छाव्यांना जन्म दिला आहे ! ताडोबा हे महाराष्ट्रातील वाघांसाठी एक आशेचा किरणच आहे.

प्रत्येक अभयारण्यामधे जंगलाच्या आतील बाजूस Core Area असतो..जेथे कोणत्याही वाहतूकीस किंवा पर्यटकांना बंदी असते.ह्या Core Area ला वन-रक्षक अगदी मूलाप्रमाणे जपतात . ताडोबाच्या Core Area च्या अगदी जवळच प्रचंड आकाराच्या कोळश्याच्या खाणीचा प्रस्ताव सरकार कडे सादर करण्यात आला आहे. अडानी पावर नावाच्या कंपनीला लोहारा गावाजवळ १८० हेक्टर वर खाणकाम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. ह्या प्रकल्पा-अंतर्गत खाणीखाली जाणाय्रा जमीनीमध्ये जंगलाचा फार मोठा परीसर आहे जो की वाघांचा,दूर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांनी भरलेला आहे. ह्या प्रकल्पामूळे प्रभावीत होणारे प्राणी भारत सरकरने संरक्षीत म्हणून आधी जाहीर केलेले आहेत. हे खाणीचं काम जर चालू झालं तर तिथे येणारी मोठी मोठी वहाने,माणसे ,प्रदूषण , कोलाहल यांनी जंगलातील प्राणी या पासून पळून जाण्याचा प्रयत्न करतील पण रहाण्यासठी दूसरी जागाच नसल्यामूळे प्राणाला मूकतील किंवा मग प्राणी मानवी वस्तीत घूसण्याच्या गटनात वाढ होइल.मग परत मनूष्य विरूद्ध प्राणी असा खेळ चालू होइल आणि अशा खेळत माणूसच नेहमी जिंकत आला आहे...दूर्दैवानी..


पर्यावरण आणि वन्यजीव या दोनच खात्यांशिवाय कामासाठी लागणाय्रा सर्व परवानग्या कंपनीने आधिच मिळवलेल्या आहेत आणि या परवानग्या कशा मिळतात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहेच..उरलेल्या २ परवानग्या पूढील २ महीन्यात मिळण्याची शक्यता आहेत.म्हणूनच कंपनीला या सूंदर जंगला मध्ये खाणकाम करण्यास परवानगी मिळू नये व त्यांनी हा उद्योग दूसरीकडे हलवावा तद्नूसार निसर्गाला कमीत कमी हानी होइल म्हणून आपण या प्रकल्पाला जोरदार विरोध केला पाहीजे. आपला विरोध प्रकल्पाला नसून प्रकल्पाच्या जागेला आहे.

अशा कोळश्याच्या खणींमध्ये सूरूंगाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ,सूरूंगाच्या स्फोटांमूळे ध्वनीपदूषण तर होतच शिवाय दूर्मीळ पक्षीही निघून जातात. मोठ्या मोठ्या खाणींमूळे भूअंतर्गत पाण्याच्या प्रावाहातही अडथळा निर्माण होतो, विहीरींचे पाणी आटते आणि शेतीवरही परीणाम होतो.
वाहानांमूळे होणारे प्रदूषण ते वेगळेच ह्या सगळ्या हालचालींचा परीणाम थेट जंगलावर , आपल्या सर्व प्राण्यांवर पडेल .

माहीतीच्या आधिकाराचा वापर करून आपल्याला याची पूर्ण माहीती मिळू शकते व आपण महराष्ट्रातील या बहूमोल संपत्तीला वाचवण्यासाठी ठोस पावलं उचलू शकतो. ताडोबाचं जंगल वाचवण्यासाठी आपण शक्य तो प्रयत्न करू. दूर्दैवाने बहूतांश जनतेला या प्रकारासंबंधी काहीच माहीती नाही.

वाघ वाचवण्यासाठी वन्यजीव प्रमींनी आधीच मोहीम उघडली आहे. जास्तीत जास्त जनता यात सामील व्हावे असे मी आव्हान करतो.

यावर नक्की विचार करा व तूमच्या प्रातीक्रीया मला कळवा.सध्या प्रकल्पावर Stay आणण्यासाठी वकीलांशी बोलणे चालू आहे.तूम्हालाही जर या मोहीमेत सहभागी व्यायचं असेल तर तूमचा E-mail ID मला पाठवा . पूढील हालचाली वैयक्तीकरीत्या मी मेल मधूनच कळवीन.

Read more...

अप्रतीम प्रदर्शन

>> Monday, December 8, 2008

नमस्कार मित्रहो..
काल परवाच पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेंटिग्ज चे प्रदर्शन भरविण्यात आल्याची बातमी पेपर मध्ये वाचली. आजच प्रदर्शन पाहून आलो.
FACT INDIA या संस्थेने या प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे.
पुण्यातील घोले रोड वरील नवीनच तयार केलेल्या आर्ट गालरीमध्ये २० तारखेपर्यंत सकाळी १० ते ८ पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे.
राजस्थान मधील निष्णात कलाकारांनी महाराजांच्या जीवनातील प्रसंग अत्यंत सुंदर रीत्या रंगविलेली आहेत.
चित्रांमधील बारकावे अगदी अचूकपणे रंगवलेले आहेत. मोठ्या मोठ्या चित्रातील प्रत्येक व्यक्तीचे दाग दागीने , कापडे त्यावरील नक्षी सूद्धा त्यांनी खूप छान काढली आहे.
इतकी डीटेल चित्रे काढायला किती वेळ आणि किती कष्ट पडले असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या गटना शक्य तितकी माहीती घेउन त्यांनी चितारले आहेत. चित्रांची तर प्रशंसा करावी तितकी कमीच. चित्राबरोबर राजपूतांची , मुघलांची महाराजांबद्दलची पत्र , लिखाणेही येथे मांडली आहेत शिवाय अ-मराठी नागरीकांसाठी English मध्ये महाराजांची माहीती लिहीलेली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्व चित्रे कोणत्याही मराठी माणसाने काढली नसून ती सर्व अ-मराठी आहेत ,FACT India मधीलही बरेच कर्मचारीही अ-मराठीच आहेत.
तिथे असलेल्या FACT INDIA च्या volunteer शी आम्ही थोद्यावेळ गप्पा मारल्या. विरू नाव त्यांचे. काही दिवसांपूर्वी ते माहीती घेण्यासाठी पुण्यात आले होते.त्यांना ती शोधताना फारच कष्ट पडले. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कोणत्याही घटनेमध्ये कोणाचेही एकमत नाही, हे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले आणि दू:खही..
त्यांचं बोलणं ऐकून मला फार वाइट वाटलं. महाराजांसारख्या अद्वितीय माणसाबद्दल इतकी कमी माहीती कशी हा प्रश्ण त्यांना होता..जो मलाही आहे.
महाराजांची माहीती जी महाराष्ट्राला माहीत आहे ती सर्व भारताला व जगाला कळावी यासाठी आपणच प्रयत्न केले पाहीजेत. Blog मधून, e-mail मधून त्याचा व्यवस्थीत प्रसार , प्रचार केला पाहीजे , भारतातल्या इतर राज्यांमधे महाराजांना पोचवले पाहीजे , नाहीतर अजून शे-दोनशे वर्षांनी महाराज कोण होते हेही माणसे विसरून जातील. त्यांचे कार्य ,कर्तूत्व,स्वराज्यासाठी केलेले प्रयत्न सर्व विस्म्रुतीत जातील.
या साठी आपण सर्व जण मिळून महाराजांना जिवंत ठेवण्याचे काम केलेच पाहीजे.
असो...
तर याचीच पहीली पायरी म्हणून सगळ्यांनी न विसरता वेळ काढून हे प्रदर्शन पहावे आणि त्याचा Blog विश्वात प्रसार करावा असा आग्रह मी धरतो..

Read more...

बळीचे बकरे आबा..

>> Monday, December 1, 2008

अतिरेकी येउन मेले आणि आपल्याकडे राजकारणी राजकारणच्या रंगपंचमीत रगून गेले.. कोणी कोणावर आरोप फेकतय तर कोणी कोणावर राजीनाम्याचा आदेश..सूपातल्या तांदळासारखे "भारतीय नागरीक" ही सगळी जत्रा मजेने ( रागाने??) बघत आहेत..दूसरं काय करणार? लहान मूलाला नवीन खेळणं दिलं की ते २ दिवस त्याच्या बरोबर खेळत बसतं , त्याप्रमाणे नवीन एखादी ब्रेकिंग न्यूज घडली की सगळे राजकारणी त्याच्यात खेळण्यात गूंग होतात...मग ते खेळणं आपल्याला मिळावं म्हणून एकमेकांत हाणामाय्रा करतात..

या सगळ्या खेळामध्ये एका बाळाची तर खूर्चीच कोणितरी पळवली..म्हणजे काढून घेतली...आपले आबा हो..त्यांची..
आबा बिचारे काय करणार ? काल राजीनामा विचारणाय्रांना नैतिकता विचारणारे आबा आज न काही बोलता व त्यांच्या खास शैलीत न्यूज चानेलला प्रतीक्रीया न देता आखाड्यातून ऊठून सरळ अंजणीला निघून गेले..
काय करणार High Command चा आदेश!! ते जे सांगतील ते करावच लागत...कारण त्यांच्यामूळेच तर खूर्ची मिळाली (गेलीपण) , ते सूद्धा पंतप्राधानांच्या खूर्चीकडे चातका सारखे डोळे लाऊन बसले आहेत..ते तरी काय करणार?? चार पायांची खूर्ची पण लाखो लोकांचे हात बांधून ठेवण्याची किमया तीला जमते..काय महीमा या खूर्चीचा??

गोळीवर गोळी मारणारे आबा मात्र आता खूर्चीवर नाहीत.."बडे शेहरोमे ऐसी घटनाए होती हें’ या आबांच्या वाक्याने त्यांचा घातच केला..तस काही म्हणायचं आबांच्या मनात नव्हतं ,पण ते आलं हो चूकून..
जीभच ती कूठेही पळते..म्हणून काय मेडीया वाल्यांनी त्याचा इतका बाऊ करावा? कित्ती विचार येत असतील आर .आर. च्या मनात!!

आबांचा कारभार तसा शिस्तीचा...त्यांच्या सदय्राप्रमाणे त्यांची प्रतीमा पूर्वीपासूनच स्वच्छ!
ग्राम विकसन मंत्रालयात असताना त्यांचे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभीयान फार गाजले..त्यांनी ते गाजवले..ते इतके गाजल्यामूळे व त्यांचे इतके नाव झाल्यामूळे गटातली इतर मंडळी मात्र अस्वस्थ होती..मग लगेचच त्यांना उप-मूर्खमंत्री (sorry sorry ,मूख्यमंत्री) म्हणून बोहल्यावर चढवण्यात आलं.. त्यांनंतरही आबांनी बारबालांना घरी बसवून मेडीया व मतदारांकडून पाठ थोपवून घेतली.. सर्व सूरळीत चालू असताना ..राहूल राज आला ,बेस्ट मध्ये गोळी मारून गेला आणि आबांनी आपल्या स्वत:वर च ही गोळी मारून घेतली..विनाशकाले विपरीत बूद्धी म्हणतात ती ही!!

असो..माझ्यामते तरी...आबांची प्रतीक्रीया देण्याच्या घाइची सवय सोडली तर बाकी त्यांच्या कारभारात फार आक्षेप घेण्यासारखे काही नाही. पोलीसांना पण त्यांनी हवी ती सूट दीली होतीच...
त्यांनी ज्या धडाडीने काम केले ते भाजपाच्या वेळी मूंड्यांनीही केले नव्हते.. केवळ या घटनेवर प्रतीक्रीया व आम्हाला या देशाची किती काळजी आहे हे दाखवण्याच्या कोंग्रेस च्या केविलवाण्या प्रायत्नाच्या बळीचे बकरे आबा झाले आहेत..

स्वत:ला ’सूपर उप-मूख्यमंत्री’ म्हणवून घेणारे छोटे साहेब म्हणजे अजीत दादा आता या खूर्चीच्या मागे पळत होते आणि आहेतच..आता ते उप-मूख्यमंत्री झाले म्हणून ते फार काही दीवे लावणार आहेत अशातला भाग नाही..
पण आता कोणीतरी बासयलाच हवं ना? म्हणून ते बसणार..नाहीतर ते बसलेच नसते हो!!

असो..
तर अशा राजकारणाच्या रास्सीखेचीत महाराष्ट्र त्याच्या उज्वल भविष्याची स्वप्ने पहात आहेतच.. मतदार Vot Bank मध्ये अडकून पडला आहे..शहीदांची यादी वाढत आहे..पैश्यांची गंगा अहोरत्र वहात आहे.. माय भवानी अजून शांतच आहे आणि सह्याद्री मात्र कीव येउन हसत आहे..

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP