-

किल्ले स्पर्धा - प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला

>> Friday, October 24, 2008

नमस्कार मित्रहो...

पुण्याच्या संभाजी बागेमध्ये दरवर्षी किल्ले स्पर्धा भरविण्यात येतात.
यंदा मि व माझ्या मित्रांनी पहिल्यांदाच स्पर्धेत भाग घेतला.
आम्ही विजयदुर्ग तयार केला आहे.किल्ला खूप छान झाला आहे.
प्रसिद्ध इतिहास प्रेमी निनाद बेडेकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
आजच बक्षिस समारंभ पार पडला.

आम्हाला खूल्या गटात प्रथम परीतोषिक व सर्वोत्कृष्ट किल्ला अशी दोन बक्षिसं मिळाली.

किल्ले विजयदुर्ग




पुण्याचे विभागीय आयुक्त नितीन करीर यांच्याहस्ते बक्षिस घेताना..
सलील,मी,मागे मोनिष , इन्द्रजीत,ह्रुत्विक..
आणि आमचे इतर गडी म्हणजे ह्रिषिकेश , मानस , शिवकुमार फोटो दिसत नाइयेत..





तर आमचा किला बघायला तुम्ही नक्की या..सस्नेह निमंत्रण...

उद्या सकाळी ७ ला किंवा १२ ला E-TV Marathi वर आमची छोटी मुलाखत दाखविणार आहेत..बघायला विसरू नका..

Read more...

सूटले..

>> Wednesday, October 22, 2008


आणि जे सगळ्यांना माहीत होतं तेच झालं...
राज ठाकरे सुटले..हिन्दी न्यूज चानेल वाल्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.



आज आपले चंद्रयान पण चंद्रास भेटण्यास सुरक्षित रवाना झाले..
म्हणजे आज एकुणच दिवस चांगला गेला.. :)

मनसे च्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत जीव गमवाव्या लगणाय्रा पवन ला आदरपूर्वक श्रद्धांजली.
गेल्या पोस्ट वर मला काही तिखट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत त्या नक्की वाचा..

Read more...

अटक झाली...

>> Monday, October 20, 2008

सकाळी उठल्या उठल्या माझा लहान भाऊ पळत वरती आला आणि म्हणाला "राज ठाकरेंना अटक झाली आणि औंध मध्ये एक बस फोडली"
मी म्हंटल आता झाल ,या वेळीपण आपल्याच पैश्यातल्या बसेस जाळल्या जाणार..
मग टीव्ही लावला..तर न्यूज चानेल वाले कोकलत होतेच.."राज शिकंजे मे"!!!
शिकंजे मे म्हणजे काय? ते हो म्हणाले असतील म्हणून पोलिसांनी पकडलं..नाहीतर पोलिस पण काय मराठीच..हेहे..
पुण्यात तरी सध्या स्थिती शांत आहे..काही तुरळक घटना घडल्या पण तसं शांतच ..
मला माझ्या लहानपणीची घटना आठवली...बाळ ठाकरेंना अटक झाली या नुसत्या अफवेनी आमची शाळा सोडून दिली होती..त्यावेळी बाळ ठाकरे कोण हेपण नीटसं माहीत नव्हतं...सगळे घरी येउन खेळत बसलो होतो.पण खूप मजा आली होती.असो..कोणचं काय आणि कोणचं काय ..
मुंबई पण सध्या शांतच आहे..खूप चांगली गोष्ट आहे..निदान सरकारी मालमत्तेच नूकसान तरी कोणी करत नाइये..
बघू आत पुढे काय होतय ते..
इतर जिल्ह्य्यातले कोणी वाचक असतील तर त्यांनी तिकडे काय चालू आहे ते जरूर कळवावे..

Read more...

Stumble Upon म्हणजे काय रे भाऊ?


गेल्या काही महीन्यांपासून Stumble Upon वर माझे प्रयोग चालू आहेत आणि मला खूप चांगले अनुभव मिळले आहेत. कोणत्याही चांगल्या ब्लोग वर अथवा वेबसाइट वर भरपूर वाचक मिळविण्यासाठी Stumble upon हा सोपा आणि महत्वाचा मार्ग आहे.

मराठी ब्लोग्स व वेबसाइट्स यांनकडे मोठ्या प्रमाणात वाचक वळविण्याची ताकद Stumble Upon कडे आहे म्हणून मी हे छोटेखानी Stumble Upon Guide लिहित आहे.

तर मग चला , Stumble Upon ची ऒळख करून घेवूया..

Stumble Upon म्हणजे काय रे भाऊ?

Internet ला अनूभवण्यासाठी असलेली social website म्हणजे
Stumble upon.. Google सारख्या सर्च ईंजीन वर शोधत बसण्यापेक्षा
Stumble Upon वर आपण आपल्या आवडत्या (Interest) विषयानूसार साइट्स किंवा ब्लोग्स सर्च करू शकतो आणि तेही फक्त एक बटण दाबून..

Stumble Upon Toolbar वरील stumble बटण दाबल्यानंतर
randomly आपण आधी दिलेल्या Interest प्रमाणे कोणत्याही साइट वर अथवा ब्लोग वर जाऊन पोहोचतो. हे Interest चे विषय आपण कधीही बदलू शकतो आणि या पद्धतीने आपल्याला त्या विषयातील अनेक साइट्स पहाता येतात.जर आपल्याला एखाद ब्लोग अथवा वेबसाइट आवडली तर आपण टूलबार वरील Thumps up Or Thumps Down करून आपली पसंती अथवा नापसंती कळवू शकतो.

Stumble upon चा वापर आपण social bookmarking म्हणूनही करू शकतो.
आपल्याला आवडलेला लेख अथवा कवीता आपण Stumble Upon मार्फत मित्रांना पाठवू शकतो.

Stumble Upon ला सुरुवात कुठून करायची?
सुरुवात करताना प्रथम Stumble Upon साइट वरील Stumble Upon Toolbar Download करा व Stumble Upon Toolbar install करून घ्या.
यानंतर या पेज वर जाउन आपली वेबसाइट अथवा ब्लोग Stumble Upon वर आहे का ते पहा.


जर आपली वेबसाइट अथवा ब्लोग यामध्ये नसेल तर आत्ता नवीनच install केलेल्या टूलबार वरील I like it हे बटण दाबा. ह्या नंतर एक छोटी Pop-Up Window open होइल, त्यामधे तूमच्या ब्लोग चे छोटे Description लिहा व तुमच्या ब्लोग ची Category choose करा. आता तुमचा ब्लोग Stuble Upon Detabase मध्ये जमा होइल व जेव्हा एखादी व्यक्ती त्या category मध्ये सर्च करेल तेव्हा तो तुमच्या ब्लोग वर येइल.



मी Stumble Upon का वापरू?
Stumble Upon त्याच्या प्रचंड प्रमाणत वाचक देण्याच्या कुवतीमुळे प्रसिद्ध आहे. जर तुमच्या ब्लोग वर उत्तम आणि Original लिखाण असेल तर Stumble Upon वरून तूम्हाला हजारोंच्या संख्येनी वाचक भेटतील आणि तेही तूमच्या विषयात Interested असलेले.

जेव्हा तुमची साइट Stuble होते , त्यानंतर लगेचच तुम्हाला जगभरातून वाचक मिळू लागतात. पण त्यासाठी तूमच्या ब्लोग वरील लिखाणामध्येही तितकाच दम असणे आवश्यक असते..

ह्यामुळे..
१.तुमच्या ब्लोग ला मोठ्या प्रमाणावर Exposure मिळते.
२.मोठा वाचक वर्ग जमा होतो.
३.आणि त्यामूळे जास्तीत जास्त वाचक आपल्या ब्लोग वर येतात आणि ही संख्या वाढत जाते.



तर मग मित्रहो आज इतकच...

या Stumble Upon ची सुरूवात तुम्ही माझ्या ब्लोग ला Thumps Up करून केलत मला खूपच आनंद होइल..

काही प्रश्ण किंवा शंका असतील तर जरूर विचारा.

धन्यवाद...

Read more...

आयुष्य - छान कवीता

>> Sunday, October 19, 2008

मेल मधून ही कवीता मिळाली...
आवडली, छान आहे...
तुम्हीही वाचावी म्हणून पोस्ट करत आहे..
लेखकाचं नाव खाली नमूद केलं नव्हतं..

एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...

असा वाटण्याची जागा मग,

मूल झालं की...

मोठं घर झालं की...

अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते.

दरम्यानच्या काळात, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली

की सारं ठीक होईल, अशी आपण मनाची समजूत घालू लागतो.



मुलांच्या वाढत्या वयात, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत

असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला

वाटत असतं.



आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...

आपल्या दाराशी एक गाडी आली की...

आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...

निवृत्त झालो की...

आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.



खरं असंय, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य

वेळ कोणतीही नाही.

आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी

राहायचा निश्‍चय करायचा हेच बरं नाही का?



जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये, असंच बराच काळ वाटत

राहतं.

पण, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्‍वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा

असतो, काही ऋण फेडायचं असतं....

आणि अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.



या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,

आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.

आनंद हाच एक महामार्ग आहे.

म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.



शाळा सुटण्यासाठी... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी

होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं

लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी...

नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी... थंडीसाठी... सुखद

उन्हासाठी... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो.

एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली

समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.





आता एक गोष्ट.

काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत

सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे

होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.



पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही.

पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.



धावता धावता एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.

त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले.

सारे मागे फिरले... सारे जण...



'डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला

मिठी मारली आणि मग विचारलं, ''आता बरं वाटतंय?''

मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत

गेले.



ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत

साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत

होता...

त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.

का?

कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची

गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते.



आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं.

त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते

.



शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित

इतरांचंही...



दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.

नाही का?

Read more...

3rd Commonwealth Youth Games Pune Report -उत्तरार्ध

>> Tuesday, October 14, 2008

नमस्कार मित्रहो..CYG च्या report चा उत्तरार्ध पोस्ट करीत आहे.
उशीर झाल्याबद्दल माफ़ी असावी...

७१ देश represent करण्यासाठी ७१ शाळा participate झाल्या आहेत,अस कळलं. नक्की त्या काय करणार आहेत हे अजून माहीत नाही. सराव फक्त पाहीला. पण तो पाहील्यावरही accuracy , professionalism जाणवलं नाही.पण आपली लहान मुलं मात्र October च्या भर उन्हात सराव करत होती. तेही सकाळी ११ पासून ४ वाजे पर्यंत..!! Opening ceremony तरी चांगली होइल अशी आशा करूया..

परतीच्या वाटेवर खूप शाळांतील मुलं Baton Relay च्या स्वागता साठी थांबली होती.
शहरातला प्रत्येक माणूस सहभागी व्हावा हेच या मागचं उद्धिष्ट असावं.

Volunteer म्हणून CYG मध्ये यायची प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत.काही जणं मदत करायला आवडतं म्हणून ,काही जणं uniform चा show-off करण्यासाठी ,काही जणं certificate साठी. मला पण बय्राच जणांनी विचारल काय गरज आहे जायची? माझं उत्तर असं आहे की ,एकतर आपल्या शहरात CYG होत आहे,
volunteer ship साठी profession , education , age m इ. कशाचीही अट नाइये, मग या देशाची नागरीक ,शहरवासी म्हणून खारीचा वाटा उचलायला काय हरकत आहे?

असो, पहीला दिवस असा पार पडला .आज मांडलेली मतं कदाचीत बदलतीलही..आणि रोज काय घडलं हे सांगायला मी पोस्ट लिहीनच.

तर भेटू उद्याच..bye bye..आणि वेळ देऊन वाचल्याबद्दल धन्यवाद..तुमच्या प्रतिक्रिया मला अजून लिहायला प्रोत्साहन देतात..तर प्रतिक्रीया द्यायला विसरू नका..

पहील्या दिवसाचे काही फोटो मी ब्लोग मध्ये पोस्ट केले आहेत.

Read more...

3rd Commonwealth Youth Games Pune Report - पूर्वार्ध

>> Saturday, October 11, 2008

नमस्कार मित्रहो,
आमच्या सारथीच्या लेखक वर्गात आणखी एका लेखीकेची भर पडली आहे. ऋतुजा कशाळकर त्यांचे नाव.
तर ऋतुजा ताईंचा पहील्या लेखाचा पूर्वार्ध आपल्यासाठी पोस्ट करीत आहे..उत्तरार्ध २,३ दिवसात प्रकाशीत होइल..

पूर्वार्ध
blog साठी छान काहितरी लिहायच होत.पण विषयच सापडत नव्हता.आज तो मिळाला.
मी Commonwealth Youth Games साठी Volunteer आहे.दोन महीने आधीच registration झाल.मग interview झाला,selection झालं आणि मग step by step training झाली. एवढं सगळं होत असताना actual games च्या वेळी काय आणि कसं असेल याची उत्सुकता खुप होती. आपण घेतलेल training कधी आणि कसं वापरू शकू आपण, याचा सतत विचार चालू असायचा..

आज volunteer म्हणून काम करायचा पहिला दिवस .दसय्राच्या मुहूर्तावर चालू झाल हे चांगल झालं असं उगीच वाटलं.दिलेला uniform घालून छत्रपती श्री शिवजी महाराज क्रीडनगरीत गेले.बसच schedule पण आर्धेच कळलेल.बस कुठेपर्यंत जाणार, stadium मध्ये कुठुन कस जायच,PMT bus volunteer साठी फ़्री आहे हे खरचं आहे का?,असे नानाविध प्रश्न येत होते.बस मिळली .बालेवडीत शिरताना खुप सारे boards दिसू लागले.मुख्य प्रवेश द्वारातून आत आल्यावर वातावरण बदललेल जाणवलं..

आत जाताना checking झालं , डोळ्यांना खूप काही दिसत होत.वेगवेगळी माणसं ,भरपूर काम,गाड्या ,पोलीस , शाळेतली मुलं , माझ्यासारखेच volunteers आणि शिवाजी महाराजांचा पुतळा .हे पहात असतानाच माझी team कुठे आहे ,कामचं ठिकाण, काम , जागा इ. डोक्यात चालूच होत.शेवटी team members and leader भेटले..कामाच स्वरूप समजलं .पण नुसतच समजून उपयोग नाही तर ते करणं पण जरूरी आहे. system ,process ची घडी रूळली नसल्यामुळे बारीक सारीक त्रुटी दिसत होत्या आणि जाणवतही होत्या.

तास-दीड तास झाल्यावर आजच काम झालय अस कळल.तोपर्यंत team members चे चेहरे ओळखीचे झाले होते.निरोप घेउन प्रत्येक जण निघाले.

आल्याबरोबर लगेच काय जायचं आणि इकडे तिकडे फिरू या दोन करणांमुळे मी मात्र तिथेच घुटमळत राहीले. Athletics stadium मधला मुलांचा सराव पाहीला.मग मी निघाले.फिरत असताना दाखल झालेले संघ दिसले.आपल्या देशात खेळण्यासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यांना पाहून छान वाटत होत. आपण host आहोत याबद्दल नक्कीच अभिमान आणि त्यात महाराष्ट्रात म्हणून जास्तच!!

सगळ नाही पण बरच काही डोळ्यात साठवून घरी निघाले. CYG ने प्रशिक्षण नीत व्हावं ,योग्य तो message ,content पोहोचावा ,सगळ्या volunteers ना एका common base ला आणावं यासाठी खूप आणि चांगले प्रयत्न केले. प्रशिक्षण घेताना खूप भारी वाटायच.

पण आज एकूण परीस्थिती पहाता प्रशिक्षण आण implementation यात अंतर असल्याच जाणवलं..बराचसा गोंधळ होता. Volunteers स्वतहाच काम ,टीम , हेड, कामच ठीकाण याबद्दल साशंकता होती.हे झाल माझं मत.पण नंतर बय्राच जणांशी बोलणं झाल तेव्हाही सर्वांचा हाच सूर होता.

तिथल्या कामाबदल सांगायच झाल तर ७०%-८० % कामं पूर्ण झाली आहेत.पण छोट्या छोट्या खूप गोष्टी अजून बाकी आहेत.झाडं लावणं , साफ़सफ़ाइ , सुशोभीकरण खूप बाकी आहे.जे की आत्तापर्यंत पूर्ण होणं आपेक्षित होत.आत उरलेल्या वेळात ही काम होतील अशी अपेक्षा करू. तरीपण final touch देणं राहून जाइलच.

पुण्यातील शरद पवार , अजित दादा यासारख्या आणि अनेक मूर्ख आणि स्वार्थी राजकारण्यांच्या मुळे या कामांना विलंब झालाय नाहीतर सर्वकाही आधीच पुर्ण झालं असतं.हे काम पुण्यासाठी नाही तर भारतासाठी करत आहोत हे गोष्ट यांच्या लक्षातच येत नाहीत.या बद्दल वर्तमानपत्रात लेख रोज येत आहेतच.

Read more...

२ ओक्टोबर

>> Wednesday, October 1, 2008

नमस्कार मित्रहो...
आज २ ओक्टोबर...
वाढदिवस गांधीजींचा,
आणि माझापण...
सध्यस्थितिला माझ्या या ब्लोगची परिस्थिति फ़ार काही चांगली नाही..
४ च पोस्ट मे ’पोस्ट’ केले आहेत..
वाचक संख्या जवळ जवळ ० आहे..
अजुन खुप काम बाकी आहे..खुप काम करायचं आहे..
बघू...आजचा दिवस तर माझाच आहे..:)
लवकरच ही परिस्थिती बदलेल...आणि मी ती बदलीन..

Read more...
Related Posts with Thumbnails

Total Pageviews

Follow me on Blogarama
Netbhet.com  मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
Blogvani.com
eXTReMe Tracker

  © Blogger template Inspiration by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP