Saturday, November 29, 2008

हल्ला आणि राजकारण


अखेर दहशद वादींचा आपल्या शूर NSG Commondo नी नायनाट करून टाकला.
परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे पोलिसांच्या लगेच लक्षात आले हे एक बरे झाले.. Army चे लोक शांतपणे आले आपलं काम केलं आणि शांतपणे निघून गेले..कुठेही गजावजा नाही कुठेही प्रसिद्धी नाही..
टीव्ही वर जेव्हा हे बघत होतो तेव्हा दिसत होत की या NSG commondos चे हेल्मेट किती साधारण दर्जाचे आहेत..आपण दूचकी वर घालतो त्यासारखी हेल्मेट ते अतीरेक्यांशी लढताना वापरत होते...
शहीद हेमंत करकरे यांनाही डोक्यात गोळी लागली ती हेल्मेट च्या आरपार जाउन..स्वत:च्या जीवावर उदार होण्यार्या अशा जवानांसाठी अशा हलक्या प्रकारची समूग्री का???
राहून राहून या गोष्टीचं फार वाइट वाटत आहे आणि रागही येत आहे..
दिल्ली मध्ये AC त बसण्याय्रा राजकारण्यांना आपली खूर्ची सोडून दूसरीकडे लक्ष्य द्यायला वेळ मिळतो का??
या घटनेचा आता निवडणूकीत कसा वापर करायचा या बद्दल लगेच राजकारण्यांमध्ये चर्चा चालू झाली...भाजपा असो, कोंग्रेस असो अथवा अजून कोणी पवार ,पाटील असो..सर्व तसेच...

या वेळी मात्र मीडीया खूप जबाबदारीने वागताना दिसून आली. कूठेही भडकऊ अथवा एखाद्या समाजाला लक्ष करून breaking news आल्या नाहीत.
सर्व चानेल चे Reporters रात्रंदिवस तेथे हजर राहून बातम्या पूरवीत होते..
त्यामूळे प्रत्येक घटनेचा तपशील लगेच कळत होता..

या घटनेनंतर तरी आपल्या सरकारने खडबडून जागे व्हावे आणि आपल्या सैनिकांना अधिक सक्षम करावे.
ही आपल्या सर्व नागरीकांची जबाबदारी आहे की आपण शक्य ती मदत पोलिसांना केलीच पहीजे..

या घटनेचा वापर आता राजकारणी आपल्या खूर्चीच्या राजकारणात करू नये एवडीच अपेक्षा....

1 comment:

anaconda said...

donhi bajune sudharana zali pahije

-

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template